शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

राजारामबापू नाट्यगृहात गैरसुविधांचा रंगमंच : इस्लामपूर पालिकेचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 23:21 IST

पालिकेत सत्ता असताना राष्ट्रवादीने शहरात चांगल्या दर्जाचे नाट्यगृह बांधल्याचा कांगावा केला. याचे उद्घाटन ज्येष्ठ सिनेअभिनेते नाना पाटेकर यांच्याहस्ते झाले.

ठळक मुद्देकार्यक्रम सुरू असतानाच साऊंड बॉक्सने घेतला पेट

अशोक पाटील।इस्लामपूर : पालिकेत सत्ता असताना राष्ट्रवादीने शहरात चांगल्या दर्जाचे नाट्यगृह बांधल्याचा कांगावा केला. याचे उद्घाटन ज्येष्ठ सिनेअभिनेते नाना पाटेकर यांच्याहस्ते झाले. परंतु काही दिवसातच हे नाट्यगृह दर्जाहीन झाल्याचे स्पष्ट झाले.

या नाट्यगृहातील ध्वनी यंत्रणेचे तीनतेरा वाजले असून, अद्यापही ही व्यवस्था सुरळीत झालेली नाही. यावर तीनवेळा लाखो रुपयांचा खर्च केला आहे. रविवारी झालेल्या ‘लोकमत’ सखी मंचच्या कार्यक्रमात तर चक्क नाट्यगृहातील साऊंड बॉक्सने पेट घेतला. प्रसंगावधान राखल्याने कोणताही अनर्थ घडला नाही.तत्कालीन मंत्री, आमदार जयंत पाटील यांनी स्थानिक कलाकारांना व्यासपीठ मिळावे यासाठी इस्लामपूर शहरात चांगल्या दर्जाचे नाट्यगृह असावे, असा मानस व्यक्त केला होता. त्यामुळे त्यांनी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या जागेत नाट्यगृह उभे केले. त्यावेळी नाट्यक्षेत्रातील लोकांना बरोबर घेऊन शहरी भागातील नाट्यगृहाची पाहणी करून त्या धर्तीवर इस्लामपूरचे नाट्यगृह करा, अशा सूचना जयंत पाटील यांनी संबंधितांना केल्या होत्या. परंतु या सूचनेकडे कोणीही गांभीर्याने न पाहिल्यानेच नाट्यगृहाची ध्वनी व्यवस्था पहिल्यापासूनच कोमात आहे. ती अद्यापही बाहेर आलेलीच नाही.

नाट्यगृहातील ध्वनी यंत्रणेत बिघाड असल्याने येथे कोणतेही चांगल्या दर्जाचे नाटक अद्याप आलेले नाही. तसेच कोणताही मोठा करमणुकीचा कार्यक्रमही आणण्याचे धाडस कोणी केलेले नाही. कारण येथील ध्वनी व्यवस्थाच अशी आहे. पैसे देऊन कोणीही येथे येऊ शकणार नाही. नाट्यगृहात जो कार्यक्रम मोफत असेल, तोच पाहण्यासाठी नागरिक गर्दी करतात. आता तशी सवयच येथील नागरिकांना लागली आहे. त्यामुळे येथे तिकिटावर एकही कार्यक्रम होत नाही आणि एखाद्याने आणलाच, तर तोट्यात जाणार हे सांगण्यासाठी कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही.

रविवारी नाट्यगृहात ‘लोकमत’ सखी मंचचा ‘इस्लामपूर सखी सम्राज्ञी’ हा कार्यक्रम होता. हा कार्यक्रम सुरु असतानाच येथील एका साऊंड बॉक्सने अचानकपणे पेट घेतला. यावेळी महिलांची मोठी गर्दी होती. परंतु येथील ध्वनी यंत्रणेची जबाबदारी असणाऱ्या असीर तांबोळी यांनी प्रसंगावधान राखल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. अशा अनेक कारणांनी नाट्यगृहातील ध्वनी यंत्रणा नेहमीच चर्चेचा विषय ठरली आहे. कोट्यवधी रुपये खर्च करुन बांधलेले नाट्यगृह केवळ ध्वनी यंत्रणा बरोबर नसल्याने निरुपयोगी ठरत आहे.आघाडीकडूनही दुर्लक्षविकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर तरी नाट्यगृहाच्या ध्वनी यंत्रणेची साडेसाती जाईल असे वाटत होते. परंतु विकास आघाडीच बिघडली आहे. त्यामुळे त्यांनी नाट्यगृहातील बिघडलेल्या ध्वनी यंत्रणेकडे दुर्लक्ष केले आहे. 

नाट्यगृह सुरु झाल्यापासूनच येथील ध्वनी यंत्रणा चर्चेचा विषय बनली आहे. त्यामुळे येथे कोणताही कार्यक्रम घेतला, तर बाहेरुन वेगळे भाडे देऊन ध्वनी यंत्रणेची व्यवस्था आणावी लागते. त्यामुळे याठिकाणी स्थानिक कलाकारांना कार्यक्रम घेणे परवडत नाही.- उदय राजमाने, गायक व नाट्यरसिक, इस्लामपूर.

टॅग्स :Sangliसांगलीentertainmentकरमणूक