शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

राजारामबापू नाट्यगृहात गैरसुविधांचा रंगमंच : इस्लामपूर पालिकेचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 23:21 IST

पालिकेत सत्ता असताना राष्ट्रवादीने शहरात चांगल्या दर्जाचे नाट्यगृह बांधल्याचा कांगावा केला. याचे उद्घाटन ज्येष्ठ सिनेअभिनेते नाना पाटेकर यांच्याहस्ते झाले.

ठळक मुद्देकार्यक्रम सुरू असतानाच साऊंड बॉक्सने घेतला पेट

अशोक पाटील।इस्लामपूर : पालिकेत सत्ता असताना राष्ट्रवादीने शहरात चांगल्या दर्जाचे नाट्यगृह बांधल्याचा कांगावा केला. याचे उद्घाटन ज्येष्ठ सिनेअभिनेते नाना पाटेकर यांच्याहस्ते झाले. परंतु काही दिवसातच हे नाट्यगृह दर्जाहीन झाल्याचे स्पष्ट झाले.

या नाट्यगृहातील ध्वनी यंत्रणेचे तीनतेरा वाजले असून, अद्यापही ही व्यवस्था सुरळीत झालेली नाही. यावर तीनवेळा लाखो रुपयांचा खर्च केला आहे. रविवारी झालेल्या ‘लोकमत’ सखी मंचच्या कार्यक्रमात तर चक्क नाट्यगृहातील साऊंड बॉक्सने पेट घेतला. प्रसंगावधान राखल्याने कोणताही अनर्थ घडला नाही.तत्कालीन मंत्री, आमदार जयंत पाटील यांनी स्थानिक कलाकारांना व्यासपीठ मिळावे यासाठी इस्लामपूर शहरात चांगल्या दर्जाचे नाट्यगृह असावे, असा मानस व्यक्त केला होता. त्यामुळे त्यांनी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या जागेत नाट्यगृह उभे केले. त्यावेळी नाट्यक्षेत्रातील लोकांना बरोबर घेऊन शहरी भागातील नाट्यगृहाची पाहणी करून त्या धर्तीवर इस्लामपूरचे नाट्यगृह करा, अशा सूचना जयंत पाटील यांनी संबंधितांना केल्या होत्या. परंतु या सूचनेकडे कोणीही गांभीर्याने न पाहिल्यानेच नाट्यगृहाची ध्वनी व्यवस्था पहिल्यापासूनच कोमात आहे. ती अद्यापही बाहेर आलेलीच नाही.

नाट्यगृहातील ध्वनी यंत्रणेत बिघाड असल्याने येथे कोणतेही चांगल्या दर्जाचे नाटक अद्याप आलेले नाही. तसेच कोणताही मोठा करमणुकीचा कार्यक्रमही आणण्याचे धाडस कोणी केलेले नाही. कारण येथील ध्वनी व्यवस्थाच अशी आहे. पैसे देऊन कोणीही येथे येऊ शकणार नाही. नाट्यगृहात जो कार्यक्रम मोफत असेल, तोच पाहण्यासाठी नागरिक गर्दी करतात. आता तशी सवयच येथील नागरिकांना लागली आहे. त्यामुळे येथे तिकिटावर एकही कार्यक्रम होत नाही आणि एखाद्याने आणलाच, तर तोट्यात जाणार हे सांगण्यासाठी कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही.

रविवारी नाट्यगृहात ‘लोकमत’ सखी मंचचा ‘इस्लामपूर सखी सम्राज्ञी’ हा कार्यक्रम होता. हा कार्यक्रम सुरु असतानाच येथील एका साऊंड बॉक्सने अचानकपणे पेट घेतला. यावेळी महिलांची मोठी गर्दी होती. परंतु येथील ध्वनी यंत्रणेची जबाबदारी असणाऱ्या असीर तांबोळी यांनी प्रसंगावधान राखल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. अशा अनेक कारणांनी नाट्यगृहातील ध्वनी यंत्रणा नेहमीच चर्चेचा विषय ठरली आहे. कोट्यवधी रुपये खर्च करुन बांधलेले नाट्यगृह केवळ ध्वनी यंत्रणा बरोबर नसल्याने निरुपयोगी ठरत आहे.आघाडीकडूनही दुर्लक्षविकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर तरी नाट्यगृहाच्या ध्वनी यंत्रणेची साडेसाती जाईल असे वाटत होते. परंतु विकास आघाडीच बिघडली आहे. त्यामुळे त्यांनी नाट्यगृहातील बिघडलेल्या ध्वनी यंत्रणेकडे दुर्लक्ष केले आहे. 

नाट्यगृह सुरु झाल्यापासूनच येथील ध्वनी यंत्रणा चर्चेचा विषय बनली आहे. त्यामुळे येथे कोणताही कार्यक्रम घेतला, तर बाहेरुन वेगळे भाडे देऊन ध्वनी यंत्रणेची व्यवस्था आणावी लागते. त्यामुळे याठिकाणी स्थानिक कलाकारांना कार्यक्रम घेणे परवडत नाही.- उदय राजमाने, गायक व नाट्यरसिक, इस्लामपूर.

टॅग्स :Sangliसांगलीentertainmentकरमणूक